कायदे तज्ञ फली एस नरीमन यांना लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

1 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : जिल्हा वकील मंडळाच्या वतीने सभागृहात कायदे तज्ञ फली एस नरीमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. देशातील कायद्याच्या क्षेत्रात अधिकारी व्यक्ती मानली जाणारी जी मोजकी माणसे आहेत त्यात ज्येष्ठ कायदे तज्ञ फली एस नरिमन यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी २२ वर्ष मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली, सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून कार्यरत होते तर १९७२ ते ७५ या काळात भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे. १९९९ ला राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहिले अशा या अभ्यासू व्यक्तीमत्वाचे वयाच्या ९५ व्यां वर्षी दुःखद निधन झाले आहे. लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून, दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष ॲड. महेश बामणकर, सचिव ॲड. प्रदिपसिंह गंगणे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. अभय खानापुरे, ॲड. हंसराज साळुंके, ॲड. सुशिल उपासे, ॲड. गुरलिंग काळे, ॲड. दौलत दाताळ, ॲड. एम डी इंगळे, ॲड. सुर्जितसिंह ठाकुर, ॲड. भालचंद्र कवठेकर, ॲड. शिवाजी कराड, ॲड. लहू चामे, ॲड. लहू सुरवसे, ॲड. नामदेव काकडे, ॲड. शिरीष दहिवाल, ॲड. अनिल चूनगुणे, ॲड. धनराज औत्ताडे, ॲड. मिटकरी, ॲड. धनराज पाटील आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!