सामाजिक बांधिलकी जपत लातुरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी 

1 Min Read

गवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील अर्हम युवा सेवा ग्रुपच्या वतीने गरीब आणि गरजू भाजीपाला विक्री करणाऱ्या ४ नागरिकांना निरपेक्ष भावनेने भाजीपाला विक्रीसाठी ४ हातगाड्याचे व भांडवल म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये देण्यात आले.

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधी : जगाला ‘जिओ और जिने दो’चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती लातुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकल जैन समाजातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून लातुरात महावीर जयंतीचा उत्सव एकत्रितपणे साजरा केला जातो.

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त अर्हम युवा सेवा ग्रुप च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील मध्यवर्ती बस स्टँड समोर आरोग्यदायी ताकाचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ललितभाई कामदार, हसमुखभाई शहा, पोलीस मित्र सुरेशचंद्र कर्णावट जैन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष कामदार, राकेश चावला, सुरेश जैन, कार्तिक कामदार, बसवराज स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!