» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधि : लोकसभा निवडणुकीचे एका आठवड्यानंतर मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत लातूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांत सायंकाळी पारावरच्या गप्पांना उधाण आले आहे. शहरी भागात कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी डोअर टू डोअर प्रचारकार्यात गुंतले आहेत. जवळपास सर्वच गावांत सध्या निवडणुकीची चर्चा होताना दिसते. दिवसभर कडक ऊन असल्याने ग्रामीण भागातील वयस्क मंडळी गावातील मारोती मंदिराच्या पारावर एकत्र असते. सायंकाळी यात कामाच्या निमित्ताने तालुक्याला गेलेल्या किंवा शेतात कामे करून घरी परतलेल्या तरुणवर्गाचा समावेश असतो. पंधरा दिवसांपूर्वी शेत शिवार, पीकपाणी यावर होणाऱ्या संवादाची जागा आता तालुक्यातून कोणता उमेदवार लीड घेणार यावर येऊन ठेपली आहे.
विकासाची गती वाढणार का?
खासदार संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. केंद्र सरकारच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र नियमित योजना सोडून शहरी भागात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी निवडून येणाऱ्या खासदारांनी तालुका स्तरावर औद्योगिक वसाहत विकसित करण्याची मागणी होत आहे.
अपक्ष सरसावले ; युती, आघाडीतील उमेदवारांच्या
कार्यकर्त्यांना सूचना
कार्यकर्त्यांना सूचना