लातूरच्या शीरपेचात आणखीन एक मानाचा तुरा ; प्रतिष्ठित समजला जाणारा राज्यस्तरीय दादाजी वैशंपायन सामाजिक पुरस्कार डॉ. धर्मवीर भारती यांना जाहीर 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

अहमदनगर : यावर्षीचा राज्यस्तरीय दादाजी वैशंपायन अध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार पुण्यातील स्वामी समर्थ कृपांकित नारायण भाटे यांना, तर सामाजिक पुरस्कार लातूर येथील निश्चल पुरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मवीर भारती व अहमदनगर (मढी) येथील नाथ संप्रदाय संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती गुरुदत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके व सचिव फुलचंद रोकडे यांनी दिली.

गुरुदत्त सामाजिक संस्थेतर्फे अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. गुरुवार (ता.२३) दुपारी ३.३० वाजता शेवगावातील दादाजी वैशंपायन दत्त देवस्थान येथे नाशिक येथील गजानन कस्तुरे, मुंबईतील वित्त विभाग ‘एमएसडील’चे संचालक अनुदीप दिघे आदीं मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!