» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर : तालुक्यातील चिकलठाणा येथे दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला होता. त्यामध्ये चिकलठाणा येथील विद्यार्थ्यांचा निकाल चांगला लागला होता. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय चिकलठाणा व ग्रामस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी ज्याप्रमाणे आता इयत्ता दहावीत यश संपादित केले आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळातही यश संपादन करून गावचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुंडलिक वंजारे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उतम बनसोडे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.लहुजी वाघमारे, ग्रामविकास अधिकारी उषाताई दुभते मॅडम, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब देशमुख, उपसरपंच महेंद्र देशमुख, तंटामुक्त अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग जाधव, राहुलराव देशमुख, हुसेन शेख, तानाजी वंजारे बाळासाहेब भरबडे, आत्माराम जाधव, महेश इंगळे, शिक्षक वृंद, विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.