लातूर / प्रतिनिधी : राज्याचे माजीमंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार (दि.४) रोजी लातूर तालुक्यातील कातपूर, चाकूर तालुक्यातील घरणी, देवणी तालुक्यातील जवळगा येथे भेट देऊन, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. “अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन आणि प्रशासनाने या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे. लवकरच सर्व पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्ताना सरसकट मदत करण्याची मागणी सरकारकडे केली.