सुधाकर श्रृंगारेंसह १२ विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार? जागा वाटपासाठी शिंदे, फडणवीस, अजितदादा दिल्लीमध्ये

3 Min Read

हे उमेदवार बदलण्याची शक्यता ?

• सुधाकर श्रृंगारे, लातूर
• सिद्धेश्वर स्वामी, सोलापूर
• संजय काका पाटील, सांगली
• उन्मेश पाटील, जळगाव
• डॉ.प्रीतम मुंडे, बीड
• सुभाष भामरे, धुळे
• रामदास तडस, वर्धा
• रक्षा खडसे, रावेर
• सुजय विखे पाटील, अहमदनगर
• प्रताप चिखलीकर, नांदेड
• गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई
• पुनम महाजन, उत्तर मध्य मुंबई

लातूर दि.८ (प्रतिनिधी):
लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. सर्वच पक्षांनी याची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी युतीतील कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याचा वाटा ठरविण्यासाठी एकमत होत नसल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत अमित शहांच्या भेटीला गेले आहेत. यात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे. दरम्यान भारतीय जनता विद्यमान खासदारांच्या कामगिरी संदर्भात खाजगी संस्थेमार्फत एक सर्व्हे केला असून या सर्व्हेत १२ खासदारांचे प्रगती पुस्तक हे समाधानकारक नसल्यामुळे त्यांची तिकीटे कापली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या १२ खासदारांमध्ये लातूरचे खा. सुधाकरराव श्रृंगारे यांचे नाव चर्चिले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का ? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात ३६ पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. असं असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपच्या विद्यमान खासदारांची देखील धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले. या सर्व्हेतून डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

तिकीट का कापलं जाऊ शकत ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटं कापलं जाण्याची शक्यता आहे. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारणदेखील या सर्व्हेत पाहण्यात आलं. काही विद्यमान खासदारांबाबत लोकामध्ये असलेली नाराजी या सर्व्हेमधूनसमोर आली आहे. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं आता समोर
येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!