» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अंबाजोगाई रोडवरील बोरवटी येथे स्थापन केलेल्या स्थिर निगराणी पथकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पथकाच्या कामाचा आढावा घेतला.
अवैध पद्धतीने होणारी मद्य, रोकड आदी वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर निगराणी पथकांनी काळजीपूर्वक काम करावे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कार्यवाही करून 50 हजार रुपयेपेक्षा अधिक रोकड सोबत बाळगली जात असल्यास तातडीने जप्त करावी, अशा सूचना सागर यांनी यावेळी दिल्या. तसेच पथकामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची पाहणी केली. सहायक नोडल अधिकारी जावेद शेख यावेळी उपस्थित होते.
अवैध पद्धतीने होणारी मद्य, रोकड आदी वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर निगराणी पथकांनी काळजीपूर्वक काम करावे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कार्यवाही करून 50 हजार रुपयेपेक्षा अधिक रोकड सोबत बाळगली जात असल्यास तातडीने जप्त करावी, अशा सूचना सागर यांनी यावेळी दिल्या. तसेच पथकामार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची पाहणी केली. सहायक नोडल अधिकारी जावेद शेख यावेळी उपस्थित होते.