» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधी : सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीत मोठ मोठी दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने देशभरातील शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणारे अनेक निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली असल्याचे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांनी व्यक्त केले. रेणापूर तालुक्यातील मौजे हरवाडी येथे रविवारी सायंकाळी ग्रामस्थांशी युवा नेते ऋषिकेश कराड यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संवाद साधला. लोकसभेची निवडणूक देशाच्या प्रश्नांबरोबरच ग्रामीण भागातील विकास कामासाठी अत्यंत महत्त्वाची असून केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अनेक योजना सुरू केल्या असे सांगून श्री.कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि खा. सुधाकर शृंगारे यांच्यावर एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्षाला आजपर्यंत करता आला नाही अशा निस्वार्थी आणि जनहिताचा विचार करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, त्यांनी केलेल्या कामाला साथ देण्यासाठी आणि येणाऱ्या काळात आपल्या भागातील विकास कामाला गती देण्यासाठी येत्या सात तारखेला कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले. याप्रसंगी भाजपा नेते आ.रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून हरवाडी गावात आणि रेणापूर तालुक्यात झालेल्या विविध विकास कामाचा आढावा देण्यात आला. यावेळी हरवाडी येथील, ग्रामस्थ, भाजपा आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.