गहाळ झालेले लाखोंचे १२ मोबाईल फोन नागरिकांना परत

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

जळगाव / प्रतिनिधी : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसिंग व गहाळ झालेले २ लाख १० हजारांचे १२ मोबाईल फोन पोलिसांनी काल शनिवारी नागरिकांना अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात परत केले आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन मिसिंग/गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठांनी या मोबाईल फोनचा शोध घेणेबाबतत सुचना दिल्या होत्या.दिलेल्या सूचना आदेशान्वये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सायबर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचे तांत्रिक विश्लेषण करिता मदत घेवुन गहाळ मोबाईल फोन बुध्दी कौशल्याने व तांत्रीक माहितीचे आधारे विश्लेषण करुन २ लाख १० हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे १२ मोबाईल फोनचा शोध घेतला. चाळीसगाव शहर पोलिसांना हे मोबाईल फोन प्राप्त झाल्यावर नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगांव शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भटु पाटील यांच्या नेतृत्वात पोकॉ शरद पाटील, पोकों नरेंद्र चौधरी, पोकॉ मनोज तडवी, सचिन सोनवणे (सायबर पो. स्टे), पोना ईश्वर पाटील (स्था.गु. शाखा), पोकों गौरव पाटील (स्था.गु. शाखा) यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!