» मुखपत्र दक्षता वृत्तांत
औसा / प्रतिनिधी : शेतकरी शेतमजूर आणि निराधार लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नावरच्या मागणीसाठी निराधार संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेत्तृत्वाखाली गुरुवारी (दि.११) रोजी शेतकऱ्यांनी किल्ला मैदान औसा ते तहसील कार्यालय औसापर्यंत भव्य मोर्चा काढला. यावेळी मोर्चाला तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. शेतक-यांना गेल्या वर्षीचा पिक विमा तात्काळ वाटप करावा, निराधारांच्या मानधनात तीन हजार रुपयांची वाढ करण्यात यावी, सोयाबीनला १० हजार रुपये प्रतीक्विटल भाव द्यावा व अन्य मागण्याही यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी औसा तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी आणि राजीव कसबे यांनी पुढाकार घेतला होता.