पक्षाची शक्ती विचारात घेऊन महाविकास आघाडीने जागा सोडाव्यात – कल्याण पाटील

1 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत 

उदगीर : विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत, असे असले तरीही लोकसभा निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीला मिळालेला कौल विचारात घेऊन महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनेक ठिकाणी आपली ताकद नसतानाही उमेदवारी मागत आहेत. परिणामतः वातावरण चांगले असतानाही त्या ठिकाणचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. याचा विचार करून ज्या पक्षाची शक्ती जास्त असेल त्या पक्षाचा उमेदवार देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावा, अशा पद्धतीची विनंती उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील यांनी केली आहे. उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात काँग्रेसची विधानसभा निवडणुक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून कल्याण पाटील बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षाने प्रामाणिकपणे कार्य केले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे योग्य कारवाई करून मोठे यश मिळवून दिले. याबद्दल उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या अभिनंदनचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला. तसेच उदगीर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडावा, आणि विजयाची खात्री करून घ्यावी. अशी अपेक्षाही याप्रसंगी कल्याण पाटील यांनी व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!